भारतातील पहिली लोकसभा निवडणूक-India’s first Lok Sabha election In Marathi

भारतातील पहिली लोकसभा निवडणूक-India’s first Lok Sabha election In Marathi 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आणि त्यानंतर स्वातंत्रोत्तर काळातील पहिली म्हणजेच 16 वी लोकसभा मे 2014 मध्ये अस्तित्वात आली. स्वतंत्र भारताची पहिली लोकसभा निवडणूक ही 25ऑक्टोबर 1951 ते फेब्रुवारी 1952 या चार महिण्याच्या कार्यकाळात पार पडली. हि भारतातील पहिली लोकसभा निवडणूक असल्यामुळे भारतातील लोकांना त्याबद्दलचे कुतूहल आणि उत्सुकता होती.

पंडित नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही काळ भारतात निवडणूक झाल्या नाही. आणि त्याच दरम्यान देशाचा कारभार चालविण्यासाठी पंडित नेहरू यांनी त्यांच्या पंतप्रधानकिच्या खाली त्यांनी मंत्रिमंडळ स्थापन केले होते. त्या मंत्रीमंडळात पक्ष भेद न करता सर्व उमेदवारांना समानता दिली होती.

भारतातील पहिली लोकसभा निवडणूक-India’s first Lok Sabha election In Marathi

India's first election

त्यानंतर 1952 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक जाहीर झाली.नेहरूंनी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळात मतभिन्नण्तेचा फटका बसायला लागला. त्यानंतर काही मोठयालोकांनी त्यांचे पक्ष स्थापन केले.

जसे श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यांचा जनसंघ पक्ष स्थापित केला. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. आचार्य कृपालांनी यांनी किसान मजदूर प्रजा स्थापन केली. त्यानंतर जयप्रकाश नारायण आणि राजमोहन लोहिया यांनी मिळून समाजवादी पक्षाची स्थापना केली.

एवढे पक्ष स्थापन केले असता कम्युनिस्ट पक्षाने सुद्धा त्यांची चूल मांडली. या पहिल्या लोकसभेच्या काळात त्यावेळी कांग्रेस हाच पक्ष प्रबळ आणि राजकीय दृष्ट्या प्रमुख कार्यरत होता. त्यानंतर 1951 साली भारतात लोकसभा निवडणूक घेण्यात आल्या. त्या म्हणजे 26 राज्यात 489 जागांसाठी 401 मतदारसंघात ह्या लोकसभेच्या निवडणूक घेण्यात आल्या.

त्यावेळी भागाच्या लोकसंख्येनुसार त्या जागेवर मतदान घेण्यात आले. जसे काही जागी दोन-तीन जागांसाठी तेथील लोकसंख्या बघता घेण्यात आली. पहिली लोकसभा निवडणूक त्यावेळी भारतात होत होती आणि त्याचा जनतेत खूप कुतूहल सुद्धा होत. पण त्या वेळी भारतात फक्त 45 इतकेच मतदान झाले. या दरम्यान स्वतंत्र भारतातील पहिली लोकसभा निवडणुकीचे पहिले मत हिमाचल प्रदेशात असलेल्या चिनी या मतदान केंद्रावर नोंदविण्यात आले.

या निवडणुकी दरम्यान कांग्रेस हा पक्ष प्रबळ असल्याने पहिल्या लोकसभा निवडणुकीत 489 जागांपैकी 364 जागा जिंकून भारतात पहिल्या निवडणुकीत आपले यश संपादन केले. आणि सत्तेत आला. त्यावेळी दुसरा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष म्हणून 16 जागा जिंकत कम्युनिस्ट पक्ष ठरला.

या निवडणुकीदरम्यान पंडित नेहरू हे उत्तर प्रदेशातील फुलपुर या मतदार संघातून विजयी झाले. हा मतदार जोड होता त्यामुळे दुसऱ्या मतदारसंघातून त्यांच्या भगिनी विजयालक्ष्मी या निवडून आल्या. त्याच दरम्यान कोलकाता आणि दक्षिण पूर्व भागात श्यामाप्रसाद मुखर्जी हे निवडून आले.

पहिली लोकसभा निवडणुकीदरम्यान कांग्रेस या पक्षाची संपूर्ण धुरा ही पंडित नेहरू यांनी सांभाळली. त्यानंतर कांग्रेस पक्ष त्यावेळीचा सर्वात मोठा सभासद पक्ष ठरला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top